ओळखीनंतर अनोळखी... Read Count : 18

Category : Poems

Sub Category : N/A
कस आहे ना की...
हळूच अलगद कोणी तरी आयुष्यात आल की
भर उन्हात पावसाने चातकाची तहान भागवावी 
असं काहीसं होऊन जातं...
अनोळखी ; पण ओळखीच होऊन जात..
एकाकी आयुष्यात जणू सोबतीची चाहूल देत...
बेरंग आयुष्यात जणू इंद्रधनु चे रंग चढवत..
कस आहे ना की ,
आपण अपेक्षांचं ओझ दुसऱ्यावर लादतोत..
अधिकार नसताना हक्क गाजवतोत..
कुठून येतं हे उसन बळ कोण जाणे ?.
पण समोरची व्यक्ती आपलीच आहे असं
बेधडकपणे मिरवतोत..
कस आहे ना की,
एकमेकांचा केलेला विचार हा एकमेकांना दिसतोच
असं नाही..
व्यक्त होण हे विचारांच्या बरच पलीकडे असतं...
म्हणूनच की काय,
निर्णयाला भागीदार भेटला की निर्णय चुकण्याची
भिती उरत नाही..
बाकी तुझ तू ठरव..
माझा भागीदार बनायचं
की,
ओळखीनंतर अनोळखी.

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?